भारतातील जलशक्ती / विदयुत निर्मिती इतिहासाचा मागोवा
जगात जलशक्तीचा नोंदलेला पहिला वापर इ.स. 250 साली घड्याळ चालवून झालेला दिसून येतो. यानंतर मात्र मानवाने, उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर पिठाची गिरणी, लाकुड मिल, किंवा तत्सम उपकरणे चालविण्यासाठी केला. वॉल्वेरीन खुर्चीच्या कारखान्यात 22 मार्च 1880 साली 16 ब्रशआंर्कचे दिवे चालविण्यासाठी जलशक्तीचा वापर केला आणि खऱ्या अर्थाने विद्युतीय वापरास सुरूवात झाली असे म्हटले जाते.